Saturday, June 18, 2005

भावलेल्या कविता

बहर फुलांचा सरून गेला,
बघता बघता देठही सुकला
जरी पाकळी गळून गेली
कळी एकदा फुलली होती
--- इंदिरा संत

उतारवयातील आयुष्याशी जवळीक सांगणारी ही कविता आहे. तारुण्यातील तो बहर जरी आता संपून गेला असला तरी आठवणींच्या रुपाने तो आपल्या सोबत राहतो.


सर्व काही देता यावे,
श्रेय ही उरू नये हाती
--- करंदीकर

लहनपणी शिकलेली कवितेतली ही ओळ मनात घर करून राहीली आहे. कर्मयोगाची भावना एक ओळीत व्यक्त केलेली आहे. आपले कर्तव्य करावे आणि फळाचाही त्याग करून इश्वरचरणी अर्पण करावे. हीच भावना शब्दशः जगता येणे म्हणजे आयुष्याचे सार्थक होणे.

0 Comments:

Post a Comment

<< Home