Saturday, June 18, 2005

अश्वथामा (ashvatthama)

महाभारतातील अजुन एक वेगळे व्यक्तित्व म्हणजे अश्वथामा. त्याची भाळी न भरणारी जखम वागवून असतो. अश्वथामा अमर मानला गेला आहे, ते बहुधा सांकेतिक असावे. सर्व मानव जातीत तो अंश रुपाने उरला आहे, म्हणुनच आपण सर्व आपल्या दुःखाचे सतत ओझे बाळगुन फिरत असतो. प्रत्येक दुःख आपल्या अपरिपुर्णतेच्या दुःखाची जखम कधी भरु देत नाही. ह्या अश्वथाम्याला मुक्ती देणे आपले कर्तव्य आहे.

0 Comments:

Post a Comment

<< Home